संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिवसाचे आयोजन : देश-विदेशात 500 ठिकाणी रक्तदान अभियान 

 


खामगाव, जनोपचार न्यूज नेटवर्क- आध्यात्मिकताच मानव एकता मजबूत करु शकते तसेच मानवाला मानवाच्या जवळ आणून परस्पर प्रेम व सौहार्दाचे वातावरण निर्माण करु शकते. हेच मंतव्य समोर ठेऊन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 24 एप्रिल, 2025 रोजी दिल्लीतील ग्राउंड नं.8, निरंकारी चौक, बुराडी रोड येथे ‘मानव एकता दिवस’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त देशभरातील मिशनच्या समस्त शाखांमधील भाविक भक्तगणदेखील एकत्रित येऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पित करतील व त्यांच्या महान जीवनातून प्रेरणा प्राप्त करतील.

संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण विभागाचे प्रभारी आदरणीय श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सतगुरुंच्या असीम कृपेने यावर्षी देखील जगभरातील सुमारे 500 पेक्षा अधिक ठिकाणी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक आयोजन केले जाईल ज्यामध्ये जवळपास 50,000 पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतील.

दिल्लीच्या बुराडी स्थित ग्राउंड नंबर 8 वर सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळात आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यासाठी विविध हॉस्पिटलच्या प्रशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय तंत्रज्ञांच्या टीम सहभागी होतील ज्यामध्ये इंडियन रेड क्रॉसची टीमदेखील अंतर्भूत असेल. या शिवाय देशभरातील अन्य राज्यांमध्ये आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये स्थानिक हॉस्पिटलच्या प्रशिक्षित टीम उपस्थित राहून रक्त संकलनाचे कार्य पार पाडतील. या व्यतिरिक्त स्थानिक स्तरावर सर्व ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन केले जाईल. 

उल्लेखनीय आहे, की स्थानिक स्तरावर संभाजीनगर झोनमधील बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथे गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत मानव एकता दिवसाच्या निमित्ताने संत निरंकारी सत्संग भवन, घाटपुरी बायपास, खामगांव  येथे सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हे सर्वविदित आहे, की युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी समाज कल्याणासाठी सातत्याने प्रयासरत राहिले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला त्यांनी वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील. 

युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन् 1986 पासून सुरु केलेली रक्तदान अभियानाची ही मोहिम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहचली आहे. मागील जवळपास 4 दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 8644 शिबिरांमध्ये मिशनमार्फत 14,05,177 युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले आहे आणि या सेवा निरंतर चालू आहेत. 

निश्चितच लोककल्याणार्थ चालविण्यात येत असलेले हे अभियान निरंकारी सतगुरुंकडून प्रदत्त शिकवणूकीचे दर्शन घडवत असून एक दिव्य संदेश प्रसारित करत आहे. ज्यायोगे प्रत्येक मनुष्य प्रेरणा प्राप्त करुन आपले जीवन कृतार्थ करत आहे. 

Post a Comment

أحدث أقدم