अरे देवा ! हे चाललंय तरी काय...गाळात फसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

 अरे देवा ! हे चाललंय तरी काय...गाळात फसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू



खामगाव (जनोपचार) शेतातील

मोटार चालू करण्यासाठी नदी ओलांडत असताना गाळात फसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

देऊळगाव राजा शहरा लगत असलेल्या पिंपळनेर शिवारात ३ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

रामदास अंबादास रामाने वय ४२, रा. आंबेडकर नगर असे

मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार

रामदास रामाने यांचे पिंपळनेर शिवारात आमना नदीच्या दोन्ही बाजूला शेत आहे. रात्रीच्या सुमारास मोटार सुरू करण्यासाठी या शेतातून पलीकडच्या

शेतात जाण्यासाठी ते नदी ओलांडत होते. मात्र अंधारामुळे पाण्याचा अंदाज लागला नाही व  ते गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. देऊळगावराजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक

मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक

पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुंजकर करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post